म्हातारीच्या पठाराची पाण्याची वाटणी
भुदरगड तालुक्यातील किल्ल्यास लागून म्हातारीचे पठार आहे. त्याचा उतार जास्तीत जास्त पश्चिमेस आहे व पूर्वेस कमी त्यामुळे पावसाचे पाणी जास्त पश्चिमेस जाते. पूर्वेला कमी. सरकारी योजनेतून तिथे दोन्ही बाजूला धरण बांधले गेले. त्यामुळे पूर्वेकडे पाऊस कमी त्यामुळे धरणात पाणी कमी येत असे. त्यामुळे पश्चिमेच पाणी पूर्वेकडे वळवण्याचा प्रयत्न झाला. व दोन्ही भागातील लोकांमधे भांडण जुंपले.त्यामुळे एकमेकांच तोंड ही पाहिना झाले. पावसाळा सरला व गुरे चारण्यासाठी पठारावर जनावरे चारणीस दोन्हीं बाजूची माणसे येऊ लागली. एके दिवशी पश्चिमेचा सदा व पूर्वेकडच्या वाडीचा धोंडू जनावरे चारणीस आले एकमेकाची भाकरी वाटून खाणारे आता तोंड ही पाहीनात तिकडे एक म्हातारी आपली जनावरे घेऊन आली होती . सदाची म्हैस वरती चरायला आलेली बघून
धोंडू, “ ए म्हैस इकडे कुठे घालतोस माझी हाद हाई. माझी म्हैस इथे चरणार. तू घालिव तिकड खायल्या बाजूला.”
सदा, “ए जास्ती बोलायचं काम नाही.. पठार काय तूपल्या बापाचं नाही. तुझी हिरवा चारा खाऊ दे व माझी काय दातलुदे.ते काय नाही माझी पण चरणार. तुझी चार पाहिजे तर तिकडे.”
धोंडू, “ हे बघ झुंज लागलं, आवर म्हशीला तुझ्या.”
सदा, “ लागली तर लागलं, जा काय करणार आहेस.”
धोंडू, “ तुझा माज वाढलाय व्हय जिरविन.”
सदा , “माझा माज कडतोस थांब दाखवतो तुला.”
सदा, “ तुमच्या पोरीबाळींना नांदवतच नाही.”
धोंडू, “ तुमच्या पण दिल्यात इकड, विसरू नकोस.”
सदा, “ लई बोलतोस आमच्या नाही नांदवून भाकरी खा तूच थापून मग.”
धोंडू, " आमच्या नाही नांदवाय काय हात धरून नाही गेल्यात लगीन लाऊन दिल्यात."
सदा, " मग आमच्या काय पाटन नाही गेल्यात लगीन लावून जेवण घालून दिल्यात."
धोंडू, " कळशीभर पाणी द्यायला होईना व फुशारक्या मारतोस व्हय सोड की का बांध फोडत्यासा."
सदा, " तुम्हाला पाणी देऊन आमची रान वाळवाव काय."
धोंडू, " रान वाळाय पाऊस लई पडतो नव्ह, दानत नाही तुझी."
सदा, " कुणाची दानत काढतोस थांब दावतो."
त्या दोघात मारामारी लागते. दोघ एकमेकाचे वाभाडे काढत होते.शेजारील म्हातारी हसत असते.
त्याला बघून "ए तू काय हसतीस." ते दोघे बोलले.
तेव्हा ती त्यांना बोट दाखवत. ते त्या दिशेला बघतात. तर तिथे दोघांच्या म्हैसी एकमेकींबरोबर चरत असतात.ते आश्चर्याने बघतात.
“ अरे या तर भांडत नाहीत, अस कस. ” धोंडू
म्हातारी, “ त्या भांडतील कशा, एकाच गोठ्यातील त्या. वरकड जमिनीत काय खायच्या इथ म्हातारीचे कात्याळ हाय व आता कूठल इथे हिरवाट.”
“ त्या कशा.” सदा
म्हातारी, “ सदा , तू म्हैस कुणाच्यातील. घेतलीस.”
सदा, “ शंकर अण्णाच्यातील.”
म्हातारी, “ तू र धोंडू.”
धोंडू काका, “ शंकर अण्णाच्यातील.”
त्या दोघी एकाच घरातील त्या वाटून खातात. मग तुम्ही का भांडता.दोन्हीकडील पोरी इकड तिकड नांदतात.मग भांडताय कशाला. तुम्ही दोघं पावण .मग भांडण कशाला. पाणी पण वाटून घ्या.”
तेंव्हा त्यांना पटले. व आपापल्या गावात जाऊन त्यांनी सलोखा घडविला व पठाराचे पाणी वाटून घेतले. व चारणीस गेल्यावर भाकरी पण वाटून खाऊ लागले.
सदा, “ कशा पाई भांडायचं त्यापेक्षा वाटूनच खायचं.”
धोंडू, “ आमचं पावण तुम्ही व तुमचं आम्ही. चला खोबर उधळा खोबर.”
तेव्हा सड्याची म्हातारीपण हासली. व शिवारबाचा डोंगर ही हिरवा झाला. पोर वाटून खात्याली बघून.
निष्कर्ष : सामोपचाराने घेतल की कोणताही प्रश्न सुटतो.
लेखक. : निशिकांत हारुगले.