Saturday, April 23, 2022

निसर्गाची किमया ढोल

निसर्गाची किमया  ढोल

लेखक : निशिकांत हारुगले


एकदा एक सुतार जो लाकडाच्या वस्तू बनवतो. तो चांगल्या लाकडाच्या शोधात जंगलात फिरत होता.

तो फिरत जंगलाच्या मध्यभागी गेला. तिथे एक विशाल वृक्ष होता. त्याने पाहिले. त्या वृक्षास अनेक जागोजागी ढोली होत्या. त्या वृक्षास त्याने निरखून पाहिले.त्यावर मारून पाहिले.

त्याला तो एक पोकळ व निरुपयोगी वाटला.

तो मोठ्याने म्हणाला, “की देवाने असले वृक्ष कशासाठी तयार केले.जे काही उपयोगाचे नाहीत.”

व तो तिथून निघून गेला. त्याचे हे बोलणे ढोलीत असणारी पक्षाची पिल्ले यांनी त्याचे हे बोलणे ऐकले व त्या वृक्षानेही ऐकलं.

थोड्या वेळाने तिथे एक लाकूडतोड्या आला. तो त्या झाडाला पाहून निरखून. ते खूप उंच असते व त्याच्या फांद्या खूप मोठ्या व पोकळ असल्याने

 तो म्हणतो, “हा सरपण पण द्यायच्या लायकीचा नाही. किती पोकळ आहे हा?”

त्याचे हे बोलणे ती पक्षाची पिल्ले व ते झाड एकते.

झाडाला दुःख होते. पक्षाच्या पिल्लातील एक पिल्लू म्हणते, “ खरंच हा वृक्ष निरुपयोगी आहे का?”

दुसरे पिल्लू म्हणते, “ संध्याकाळी आई आली की आपण विचारू.”

संध्याकाळी त्या पिलांची आई येते.तसेच त्या ठिकाणी अनेक पक्षांची घरटी असतात.

ती पिल्ले आपल्या आईला सर्व हकीकत सांगतात व विचारतात. “की हे झाड निरुपयोगी आहे का?”



तेव्हा पिल्लांची आई म्हणते, “या जंगलात हे झाड अत्यंत उपयुक्त आहे. कारण याच्या पोकळ ढोल्यांमधे अनेक जीवांची घरटी आहेत. जेव्हा खूप पाऊस पडू लागतो. तेव्हा अनेक खारुताई आपल्या अन्नांचा साठा इथल्या ढोलीत करतात. तसेच इतर लहान प्राणी येथे राहून याची फळे व साली कुरतडून खातात. व हा पोकळ असल्याने अनेक प्राणी याच्या पोकळीत विसावतात. याच्या दाट सावलीमध्ये कडक उन्हात अनेक प्राण्यांना निवारा भेटतो. मग आता तुम्हीच सांगा. की हे किती उपयुक्त आहे ते.”

पिल्लू म्हणाले, “ मग ते दोघे असे का म्हणाले.”

त्या पिल्लांची आई म्हणाली, “ या जगात सर्वात जास्त स्वार्थी माणूस आहे. तो फक्त निसर्गातील प्रत्येक वस्तू व घटक आपल्या मालकीचा समजतो. पण त्याच इथे काही नाही. जे आहे ते प्रकृती म्हणजेच निसर्गाचे आहे. तो उगाच खुळ्यासारख आपलं आपलं म्हणतो.

 त्या सुताराला व लाकूडतोड्या फक्त या झाडातील पोकळ लाकुडच दिसले. त्याचा इतरांना उपयोग दिसलाच नाही.

म्हणून निसर्ग त्याला वेळोवेळी अनेक निरनिराळे रोग निर्मुण शिक्षा देतो.

त्या पक्षाचे हे बोल ऐकून दुःखी झालेलं ते झाड आनंदी झाले.

तात्पर्य : निसर्गातील प्रत्येक वस्तू व घटक जिथे तिथे उपयुक्त आहे. मानवाने स्वार्थ सोडून निसर्ग चक्र बिघडवू नये. तसेच त्याच्या बुध्दीचा सर्व सजीव व निर्जीव संसाधने यांच्या संव्रधनासाठी वापर करावा.

लेखक : निशिकांत हारुगले


No comments:

Post a Comment

ट्रॉय एक ऐतिहासिक युद्ध

  ट्रॉय एक ऐतिहासिक युद्ध  आज आपण ट्रॉय या फिल्मची समरी पाहणार आहोत. फिल्मच्या सुरवातीला एका रणांगणावर  ग्रीस राजा एडमेनॉन व दुसरा राजा यां...